नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कायदा मोडणाऱ्यांना थारा दिला जात नाही. आम्ही नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना भारताकडे सोपवण्यास तयार आहोत. त्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहे. तसेच भारतासोबतचे संबंध आणखी घट्ट झाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
नीरव मोदी आणि विजय माल्या यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर बोरिस जॉन्सन म्हणाले, तुम्ही ज्या दोन व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला आहेत. त्यांना आम्ही भारतात पाठवू इश्चितो. पण काही कायद्याच्या अडचणी येत आहे. कायदा मोडून येणाऱ्याचे आम्ही कधीही स्वागत केलेले नाही, असा खुलासा त्यांनी केला.
यावेळी जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये सक्रिय असलेल्या खलिस्थानी संघटनाबाबतही स्पष्ट सांगितले. ते म्हणाले की, खलिस्थानी संघटनांचा बिमोड करण्यासाठी दहशतवादविरोधी टास्क फोर्स नेमल्या आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल.
यावेळी रशियाने मारियूपोल येथे केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की, मारियूपोल येथे ज्या पद्धतीने कारवाई केली, ती पूर्णपणे चुकीची आहे. पुन्हा एकदा आम्ही कीवमध्ये ब्रिटनचा दुतावास सुरु करण्यात येणार आहे.
भारत आणि रशिया यांचे पूर्वीपासून संबंध आहेत. रशियाबाबत भारताचीजी भूमिका आहे, ती सर्वांना पहिल्यापासूनच माहित आहे. यापुढेही भारताची भूमिका बदलणार नाही, असे जॉन्सन म्हणाले. रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारत आणि ब्रिटनचा स्टॅंड वेगळा आहे. पण भारतासोबतचे ब्रिटनचे संबंध घट्ट असून 2050पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल, असेही त्यांनी सांगितले.