मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून केवळ जनताच नाही, तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदारही उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचे दिसून आले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, जिथे आमदारांना त्यांची मतपत्रिका संबंधित पक्षाच्या नेत्यांना दाखवावी लागते, विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असते तेथे या आघाडीचे काय होईल, असा सवालही त्यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुपारी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना फडणवीस म्हणाले, “राज्यसभा निवडणुकीच्या निकालातून एमव्हीए सरकारने योग्य तो संदेश घेतला पाहिजे. राज्यातील जनताच नाराज नाही, तर विधानसभेचे सदस्यही सध्याच्या स्थितीवर नाराज आहेत हेच या निकालातून दिसून आले आहे. या निकालावरून सत्तारूढ महाविकास आघाडीने आत्मपरिक्षण केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात 20 जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत, आमदारांना त्यांचे बॅलेट पेपर संबंधित पक्षाच्या नेत्यांना दाखवावे लागले. पण तरीही ते अपयशी ठरले. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने या आघाडीचे त्यावेळी काय होईल याची कल्पना करा, असा इशाराही त्यांनी दिला.