मुंबई: मुसळधार पावसाने मुंबईची पुन्हा एकदा तुंबई केली आहे. यामुळे बीएमसीने केलेल्या नालेसफाईवर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झाले आणि एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावे लागले. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे.
बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. पण ती पूर्ण झालेली नाहीत. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते, असा टोला त्यांनी लगाविला.