कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. राजकीय फायद्यासाठी उद्धव ठाकरे बेळगाव सीमाप्रश्न उचलून धरीत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
येडियुरप्पा म्हणाले, “महाराष्ट्रात काय राहील आणि कर्नाटकात काय राहील, हे महाजन अहवालात ठरविले गेले.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजकीय लाभासाठी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी त्याचा निषेध करतो. एक इंच सुद्धा जमीन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मुख्यमंत्री मराठी आणि कन्नड भाषा बोलणार्या लोकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येडियुरप्पा म्हणाले, “आपल्या लोकांनी शांतता, बंधुता कायम ठेवली पाहिजे. मी माझ्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.
बेळगाव वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूरहून कर्नाटकला जाणारी बससेवाही रद्द करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारशी बोलणी करण्यासाठी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्री यांची नियुक्ती केली.