पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेने बांधलेल्या स्वागत कक्षाच्या ठिकाणी या वर्षीपासून नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना प्लास्टिक बॉटल ऐवजी कागदी ग्लास मधून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात पालिकेच्या स्वागत कक्षात मोठया प्रमाणात पाण्याच्या बाटल्या ठेवल्या जातात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा होतो या बाटल्याची संख्या सुमारे 4 ते 5 हजार असते. तोच कचरा टाळण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.