वाढत्या वयामुळे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे हे आजार बळावलेले आहेत. ह्या सर्व आजारांवरती विना शस्त्रक्रिया आणि योग्य उपचार आपण आज जाणून घेणार डॉक्टर गणेशसिंग चौव्हान यांच्याकडून.
प्रश्न – मणक्याचे वेगवेगळे भाग आणि रचना याविषयी थोडक्यात काय सांगाल?
उत्तर – मणक्याचे साधारणतः तीन भाग असतात. मानेचे मणके, कमरेचे मणके व छातीच्या मागच्या बाजूला असलेला पाठीचा जो भाग असतो त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. मानेच्या मणक्याचे मध्ये साधारणतः सात माणके असतात. कमरेसंबंधीचा पाठीचा कणा म्हणजे कंबरेचा भाग त्याच्यामध्ये पाच मणके असतात. आणि मधला जो भाग त्यामध्ये बारा असतात.सर्वांत जास्त ताण व आजार हे आपल्याला कमरेच्या मणक्याचे आढळून येतात. मानेचे मणके हे सुद्धा लवचिक असतात. व हाताची हालचाल ही होत असते. पण मधले जे मणके असतात ते थोडेसे स्तब्ध असतात. त्यामुळे मणक्याच्या ज्या खालच्या भागाचे जे मणके असतात त्याच्यामध्ये ते आजार असतात. जे आपल्याला साधारणतः तरुण वयात म्हातारपणात सुद्धा आढळून येतात.
प्रश्न – आता तुम्ही म्हणालात की स्लिप डिस्क, म्हणजे चकती सरकणे, मणक्याची चकती सरकणे म्हणजे नक्की काय होतं आणि त्याच्या वरती काही लोकं ऑपरेशन सुद्धा करतात , यामध्ये ऑपरेशन टाळण्यासाठी नक्की कोणते उपाय करावेत?
उत्तर – दोन मणक्यांच्या मध्ये जी चकती असते. ती साधारणतः रबराची असते व ती निर्जीव असते. जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात आपण एखादं वजन उचलण्याची प्रक्रिया करतो तेव्हा त्यावर दाब वाढतो. त्या दाबामुळे सक्तीचा काही भाग मागच्या बाजूला सरकतो. मागच्या बाजूला आपल्या संवेदनशील भाग असतो. तिथे तो दाब वाढल्यामुळे आपल्या वेदना ह्या पायामध्ये खाली जातात. किंवा कंबरेमध्ये पण होतात. कधी कधी या वेदना असह्य होऊन साधं उठणं बसणं अवघड होते. ही त्याची ही लक्षणं आहेत. तेव्हा या दुखण्यावर आपल्याला इलाज करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहेत. यात महत्वाचे म्हणजे तो आजार किती खोलवर गेला आहे, त्याची तपासणी करून त्यानुसार उपचार पद्धती केली पाहिजे. प्राथमिक स्वरूपात अराम करणे, औषधे घेणे, , फिजिओथेरपी करावी. यातूनही आराम नाही मिळाला तर, त्या व्यक्तीला शस्त्रक्रिया करायचा सल्ला देतो.
प्रश्न- स्लिप डिस्क याच्यावरती शस्त्रक्रिया टाळण्यावरती काही उपाय आहेत. ते नक्की कोणते उपाय आहेत? जेणेकरून शस्त्रक्रिया टाळून आपण आपलं आयुष्य हे आणखी सुव्यवस्थित ठेऊ शकतो.
उत्तर –
सर्व सर्वप्रथम आपण असं बघूया की शस्त्रक्रिया जर आपल्याला टाळायची असेल तर चकती सरकणे चा आजारच आपल्याला नको असेल तर आपण नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. याचबरोबर पाठीचा कणा सरळ, ताठ ठेवणे. याचबरोबर जर आपल्याला पाठ दुखीचा त्रास जाणविला तर आपण त्याची तपासणी करुन त्याला लागणारे उपचार करून त्याला बरे करतो. ह्यात शकतो शस्त्रक्रिया टाळण्यावरती भर दिला जातो. प्रामुख्याने ओझोन थेरपी चे इंजेक्शन दिले जाते. यात ओझोन गॅस सोडून मणक्याच्या बाहेर आलेला फुगीरभाग आत जातो ;
काहीप्रमाणात पूर्ववत केला जातो. त्याचा दाब कमी करून रज्जूवर येणारा दाब त्याच्यामुळे होणारे जे दुखणे असते ते पूर्णपणे बरे करता येतं. तसेच काही विशिष्ट प्रकारचे फॉरेन रिपब्लिकन इंजेक्शन्स देऊन बरे करतो. याशिवाय ओझोन थेरपी इंजेक्शन प्लस फॉरमिनल इंजेक्शन वापरून त्या संबंधित व्यक्तीला बरे करतो, आज पर्यत आपण सातशे ते आठशे लोकांना बरे केले आहे. हा उपाय शस्त्रक्रियाप्रमाणेच दीर्घकालीन उपचार यशस्वी ठरत आहे.
प्रश्न – आता वळूयात गुडघे दुखीकडे ; गुडघे दुखतायत किंवा गुडघ्यांना त्रास होतोय. हे नक्की कशाबद्दल आणि याच्यावर उपाय थोडक्यात काय सांगाल?
उत्तर –
मानवी शरीराला गतिमान राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी मुख्य भाग ठरतो तो घुडघ्याचा. गुडघे जर आपले दुखले किंवा आपण चालू नाही शकलो तर आपलं सर्वांगीण आरोग्यवर त्याचा परिणाम होतो. व्यक्तीच्या जीवनात साधारणतः उतारवयात साठीच्या वेळी हा त्रास जाणवायला लागतो. यावेळी गुडघेची झीज झालेली असते.गुडघ्याची झीज होणं म्हणजे डघ्याच्या वरती एक आवरण असतं. त्या आवरणाची जी जाडी असते ती जाडी जेव्हा घर्षणामुळे कमी होते, पातळ होते, त्यामुळे गुडघ्याच्या आतमधले बोन ते बाहेर उघडे पडतात.
त्याला आपण शेवटची स्टेज म्हणतो. घुडघे दुखीमध्ये साधरणतः तीन प्रकार पडतात. यात हलके गुडघेदुखी, ह्यामध्ये गुडघ्याचे आवरण आणि वंगण कमी होऊ लागतं ज्यामुळे गुडघे ताठरतात आणि दुखू लागतात. संधिवात हा साधारणतः साठी नंतर चा त्रास मानला जातो. वाढतं वय, स्थूलता, रजोनिवृत्ती, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, गुडघ्याची दुखापत, उपडे बसणे अशा अनेक कारणांमुळे गुडघ्यांना संधिवात होऊ शकतो. ह्यामध्ये मांडी आणि पायामधील सांधा (गुडघा) खराब होतो.
पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये आपण खात्रीशीर उपचार पद्धती करू शकतो आणि विना शस्त्रक्रिया त्या संबधित व्यक्तीला बरं पण करू शकतो. किंवा शस्त्रक्रिया लागणारा जो कालावधी आहे. तो आपण वाढवू शकतो.गुडघेदुखी कमी होण्यासाठी आणि आवरण आणि वंगण वाढण्यासाठी सुरुवातीच्या काळात औषध फार उपयोगी असतात. यात गोळ्या व गुडघ्यात इंजेक्शन्स याच बरोबर फिजिओथेरपी मधील उपकरणे आणि गुडघ्याचे पट्टे (ब्रेस) देखील सुरुवातीच्या काळात उपयोगी असतात.
प्रश्न – शस्त्रक्रिया केल्यानंतर माणसाला एक प्रकारचा आदूपणा येतो. ही शस्त्रक्रिया टाळण्यासाठी तर नक्की कुठले उपाय केले जातात.
उत्तर- विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती ह्या नजीकच्या काळामध्ये खूप वाढलेल्या आहेत. आम्ही गेले दहा वर्ष झाले याच्यावर संशोधन करतोय. आणि त्या पद्धतीमध्ये काही पद्धती ज्या आम्ही आता नमूद करतो. त्याला रोगनिवारणाची उपचार पद्धती असं म्हणता येईल. प्रलोथरपी ही अशी एक उपचार पद्धती आहे.
जे आपल्या भागात दुखर्या भागामध्ये असतो त्याला आपण स्टिम्युलेशन देऊन तिथे त्या भागामध्ये रक्तपुरवठा वाढवितो. परंतु रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला जर वाढवायची असेल तर आपल्याला स्टिम्युलेशन निर्माण करणं जेव्हा आवश्यक असतं.
ती प्रोथेरपी करतं. तसंच त्या प्रोथेरपी ने तुमचे लक्षणं कमी होतात. याचबरोबर सातत्याने संशोधन करून पीआरपी थेरपी प्लाझ्मा प्लेटलेट ही पद्धत वापरतो. आपल्या रक्तामधून ही पीआरपी थेरपी प्लाझ्मा प्लेटलेटची प्रक्रिया केली जाते. जेणेंकडून आपल्या घुडघ्यानां नवीन वंगण तयार केले जाते. याचबरोबर हाय ओलिक ऍसिडचे इंजेक्शन वापरले जातात. ही पद्धत अवलंबून आपण ऑपरेशन टाळू शकतो. आणि सर्वसाधारण माणसाला परवडण्यासारखं आहे.
प्रश्न – तुम्ही ज्या आता तीन पद्धती सांगितल्या त्या इतर आजरांवरती वापरल्या जातात का ? त्याबद्दल सांगाल ?
उत्तर – हो. गुडघ्याशिवाय खांदे दुःखी हालचाल बंद होते. तसेच प्लांटर फॅसिटायटिस म्हणजे टाचेचं दुखणे, याशिवाय स्नायूंचे जे आजार असतात. त्या प्रत्येक ठिकाणी आपण याचा उपयोग करून त्यांच्या वेदना कमी करू शकतो, किंवा पूर्णपणे बंद करून शकतो. आमच्या अनुभवानुसार हे उपचार खऱ्या अर्थाने लवकर परिणाम कारक ठरत आहेत, यात बरा होण्यासाठी आर्थिक खर्च तो पण खूप कमी असतो.
ह्यातील व्यक्त केलेली मते व्यक्तीगत तज्ञांची आहेत, ह्याला डिजिटल प्रभात सहमत असेलच असे नाही.