मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवसेनेकडून प्रशंसा करण्यात आली. जनमताचा कौल पाहता पुढील 25 वर्षे कुणीच मोदींचा सामना करू शकणार नाही, असे शिवसेनेने म्हटले.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, संपूर्ण देश मोदीमय बनला आहे. मोदींचा सामना कुणीच करू शकत नाही हे वास्तव आता स्वीकारले जायला हवे. राफेल करारासारख्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी यांच्या विरोधात भ्रमाचे वातावरण निर्माण केले. मात्र, जनतेने विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.