मुंबई – गेल्या महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून आले, तसेच टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. दरम्यान, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांचा कोणताही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही. तसेच त्यांनी कोणतेही पत्र दिले नसून, दिले असेल तर मला दाखवा असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच बाळासाहेब थोरात सध्या आमच्यासोबत बोलतच नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.