मुंबई – शेतकऱ्यांसाठी दिलासादयक बातमी समोर आली आहे. पुढील तीन महिने वीज तोडणी करणार नसल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज तोडणी तत्काळ बंद करण्याची मागणीवरून माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला होता. त्यानंतर राऊत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आगामी तीन महिने शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असल्याचे सांगत राऊन यांनी ही घोषणा केली आहे.
शेतकरी, सूतगिरणी, उद्योग यांची वीज कनेक्शन पुन्हा सुरू केली जाईल. तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी थांबवण्यात येत आहे,” महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता सर्वानी वीज बिल भरून सहकार्य करा, असे आवाहनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.