मुंबई – सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. खर तर विधानसभा निवडणुकीला दहा दिवस लोटले आहेत, तरी सुद्धा राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. भाजपा-शिवसेनेत वाटाघाटीवरून तिढा लांबत चालला असून, बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यावर आता महाराष्ट्र युवक कॉंंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांच मत व्यक्त केल आहे. ते म्हणतात, आता तसं होणार नाही, “उदयनराजे होण्याच्या भितीन एकही आमदार फुटण्याची हिंमत करू शकत नाही,” अस तांबे यांनी ट्विट करत म्हटल आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालामुळे , उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो !
महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 3, 2019
एका बाजूला भाजपा-शिवसेनेच सरकार स्थापन होईल अशी चर्चा असताना दुसरीकडे नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमदारांचा घोडेबाजार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपाकडून आमदारांवर दबाव आणण्याचे काम केले जात आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केला होता.
दरम्यान, आमदारांच्या फोडाफोडीच्या शक्यतांवर सत्यजित तांबे यांनी ट्विट केल आहे. “सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिंमत करु शकत नाही… लोकशाहीचा विजय असो ! महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचे सरकार येऊ नये हीच आहे,” अस तांबे यांनी म्हटले आहे.