मुंबई: “आपला देश स्वतंत्र आहे आणि या देशात कुठचीही महिला कितीही वर्षांची असो, कितीही वाजता बाहेर गेली, काहीही कपडे घातले, एकटी असेल किंवा मित्रांसोबत असेल पण कोणालाही तिला हात लावायचा, डोळे मारायचा अधिकार नाही म्हणजे नाही!”, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
विधानसभेत आज महिलांच्या सुरक्षेवर चर्चा झाली. दरम्यान आदित्य ठाकरेंनी आपले मत मांडले. महिला सबलीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून यावर विधीमंडळात किमान दर तीन महिन्यांनी चर्चा व्हायला हवी. आणि महिलांच्या सुरक्षेवर महिलांपेक्षा पुरुषांनी जास्त बोलायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.