नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यापुर्वी कारागृहातील प्रथेप्रमाणे त्यांना अखेरची इच्चा विचारली गेली. त्यावेळी त्यांच्यापैकी एकाही आरोपींनी कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.
कारागृहातील नियमाप्रमाणे संबंधीत आरोपींना त्यांची अखेरची इच्छा लिखीत स्वरूपात द्यावी लागते व त्यावर त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या व उपस्थित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होतात. त्यावेळी कारागृह अधिक्षक आणि जिल्हा किंवा अतिरीक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तेथे उपस्थित ठेवले जाते.
काल पहाटे साडे पाच वाजता त्या सर्वांना एकाचवेळी फाशी देण्यात आली त्यापुर्वी त्यांना त्यांची इच्छा विचारली गेली होती. पण आरोपींनी कोणतीही इच्छा नसल्याचे तोंडी सांगितले. त्यामुळे पुढील सोपस्कार टळला.