- प्रकल्पग्रसतांचे रोख रक्कम वाटपाकडे पाठ
- उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द
शिंदे वासुली – पैसे नको, जमिनीच्या मोबदल्यात जमीनच द्या, ही मागणी भामा आसखेड धरणग्रस्तांनी कायम ठेवला आहे. त्यातच शुक्रवारी (दि. 14) पुणे जलवाहिनेचे काम पोलिसंच्या फौजफाट्यात पुन्हा सुरू करण्यात आल्याने धरणग्रस्त संतप्त झाले आहे. दरम्यान, आम्ही सुचवलेल्या पर्याय सुचवले असून त्याबाबत दोन दिवसात काय तो निर्णय द्या, अन्यथा सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा देणार असल्याचा इशारा पुन्हा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात मागण्या पूर्ण होईपर्यंत जलवाहिनीचे काम बंद करण्यासाठी पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडणार असल्याचे दिसून येते.
भामाआसखेड प्रकल्पग्रसत व जिल्हा प्रशासन मागील दोन तीन वर्षांपासून पुनर्वसन व पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेबाबत संघर्ष सुरू आहे. तर प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व पात्र-अपात्र प्रकल्पग्रसतांना सरसकट 15 लाख रुपये हेक्टरी अनुदान वाटप प्रक्रीया सुरू केली होती.
भाम खोऱ्यातील पाईट, शिवे, वहागाव, अहिरे, पाळू, आंबोली आणि करंजविहीरे या सात गाव कामगार तलाठी सजामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपजिल्हाधिकारी, सर्कल, तलाठी यांच्यामार्फत संबंधित प्रकल्पग्रसत शेतकऱ्यांची कागदपत्रे व इतर संबंधित कार्यवाही करून अनुदान वाटप प्रक्रीया सुरू होती.
पर्यायी जमीन वाटप निकालप्राप्त 388 आणि 111 शेतकऱ्यांनी शासनाच्या तुटपुंज्या अनुदानावर बहिष्कार टाकत जमिनीच्या मोबदल्यात जमीनच देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे व मागण्यांचे निवेदन अनुदान वाटप प्रक्रियेस उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना शांत करून गाफील ठेवण्याचा डाव पुरता उधळलेला आहे. तर जिल्हा प्रशासनाने काही प्रमुख आंदोलकांना 149 ची नोटीस बजावून वादग्रस्त जलवाहिनीचे काम शुक्रवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरू केले असल्याने ऐन पावसाळ्यात भामा आसखेड बाधित गावांत वातावरण तप्त झाले आहे.
प्रकल्पग्रस्तांनी सुचविलेले पर्याय
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाला पर्यायी जमीन मागणी केली असून शासन म्हणतंय की वाटपासाठी जमीन उपलब्ध नाही. त्यावर शेतकऱ्यांनी धरणाच्या लाभक्षेत्रातील जमीन शासनाच्या निदर्शनास आणून ती जमीन वाटप करावी, अथवा न्यायालयात गेलेल्या सर्व 499 शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे जमीनीची किंमत द्यावी असे दोन पर्याय सुचवले असल्याचे सांगितले असल्याचे आंदोलक सत्यवान नवले, देवदास बांदल आदिंनी सांगितले.
पोलिसांचा फौजफाटा
पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस यांच्यासह 16 पोलीस अधिकारी, राज्य राखीव दलाचे 100 कर्मचारी आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 75 पोलीस कर्मचारी शुक्रवारी बंदोबस्तासाठी