मुंबई – इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतीपैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. भाजपाला 24 नगरपंचायती आणि 416 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 नगरपंचायती आणि 387 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला 18 नगरपंचायची आणि 297 जागा तसेच शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 300 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण 57 नगरपंचायती आणि 976 जागा तर भाजपाला 24 नगरपंचायती 416 जागा मिळाल्या आहेत.
काल सकाळी हे ट्वीट केल होत व सांयकाळी तेच खर ठरलं. कथित वचनासाठी(की मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी) मतदारांशी विश्वासघात करत पद मिळवले पण जनता ते स्वीकारायला तयार नाही. कितीही आव आणा सामनातून भाजपाचा नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण जमिनीवरच वास्तव बदलणार नाही https://t.co/LGpXizp7Kd
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 20, 2022
विशेष बाब म्हणजे भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या. काँग्रेसला याचा बराच फटका बसला. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण राज्याचे मुख्यमंत्रिपद असलेली शिवसेनेला मात्र निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही.
या निकालांवर भाष्य करताना भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर खोचक शब्दात टीका केली. त्यांनी ट्विट केले आहे की,’काल सकाळी हे ट्वीट केल होत व सांयकाळी तेच खर ठरलं. कथित वचनासाठी(की मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी) मतदारांशी विश्वासघात करत पद मिळवले पण जनता ते स्वीकारायला तयार नाही. कितीही आव आणा सामनातून भाजपाचा नावाने खडे फोडणारे अग्रलेख लिहा पण जमिनीवरच वास्तव बदलणार नाही.’