कोल्हापूर / प्रतिनिधी – फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीसाठी शिवभक्तांनी पन्हाळगडावर मशाली घेऊन जाण्यासाठी येऊ नये, असा आवाहन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आला आहे.
19 फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. शिवजयंतीला अनेक गडकिल्ल्यांवर वरून शिव पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर जाऊन मशाल पेटवून नेली जाते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घ काळ वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून देखील मशाली घेऊन जातात. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर ,सांगली, सातारा, पुणे यासह इतर जिल्ह्यातून शिवभक्त ऐतिहासिक पन्हाळगडावर दाखल होत असतात. कर्नाटक राज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड, अथणी परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त मशाल पेटवण्यासाठी पन्हाळगडावर येतात.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर मशाली घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी येऊ नये असे आदेश नगराध्यक्ष रुपाली धडेल दिले आहेत. कोरोणाचा संसर्ग कमी असला तरी त्याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेतला असल्याचे धडेल यांनी सांगितले.
शिवभक्तांनी पन्हाळगडावर न येताच आपल्याच गावी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करा, तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन धडेल यांनी केले आहे.