नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आखेलश यादव यांनी करोना लसीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अशातच अखिलेश यादव यांनी आज याबाबत नव्याने भूमिका मांडताना “मी अथवा समाजवादी पक्षाने वैज्ञानिक अथवा डॉक्टरांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं संपूर्ण वक्तव्य दाखवा. माझे प्रश्न हे भाजपसाठी आहेत. गरिबांना कधी लस मिळेल? हा महत्वाचा प्रश्न आहे” असं वक्तव्य केलं.
यापूर्वी यादव यांनी, “मी करोना लस घेणार नाही. मी भाजपच्या लसीवर कसा विश्वास ठेऊ? जेव्हा माँचे सरकार येईल तेव्हा आम्ही सर्वांना मोफत लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत.
देशभरातील राज्यांमध्ये करोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय रन आयोजित करण्यात आलेल्या दिवशीच अखिलेश यादव यांनी हे वक्तव्य केलं होत.
यावेळी आखेलश यादव यांनी, मुरादनगर येथील स्मशानभूमीची छत कोसळून झालेल्या अपघातावरूनही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “स्मशानभूमीतही भ्रष्टाचार करणाऱ्यांबाबत काय बोलणार? तुम्ही अंत्ययात्रांबाबत सर्वाधिक बोलत होतात, मात्र याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. यामध्ये जर कोणी दोषी असेल तर ते भाजप आहे.” असे आरोप लगावले.
I or the Samajwadi party never questioned the experts, researchers or scientists. If there are suspicion or some doubts, it is government’s responsibility to clarify: SP chief Akhilesh Yadav https://t.co/AinGCcl4dl
— ANI UP (@ANINewsUP) January 4, 2021