नवी दिल्ली- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक महत्वाची आणि दिलाासादायक माहिती पुढे आली आहे. भरतातील अनेक राज्य गेले 50 दिवस झाले कोरोनाशी लढा देत आहे. त्यातील काही राज्यांना दिलासा मिळण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
मागच्या २४ तासात ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. एका दिवसात दीव दमण, सिक्कीम, नागालँड छत्तीसगड, लडाख, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीपमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिली आहे.
देशभरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७४,२८१ एवढी झाली आहे. मागच्या १४ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग ११ दिवस होता, तो आता मागच्या तीन दिवात १२.६ एवढा झाला आहे. म्हणजे आता १२.६ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होते आहे.कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २,४१५ एवढी झाली आहे