नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असताना आणि गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ दिल्लीत आंदोलन करत असलेल्या या शेतकऱ्यांच्या विरोधात नवनियुक्त मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले होते.
आंदोलन करणारे शेतकरी नसून मवाली आहेत. असे करून ते केवळ दलालांचीच मदत करत असल्याची टिप्पणी लेखी यांनी केली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन गुन्हेगारी स्वरूपाचे असून २६ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार लज्जास्पद आहे. विरोधी पक्ष या आंदोलनाला फूस देत असल्याचीही टीका लेखी यांनी केली होती.
त्यांच्या या शेतकऱ्यांप्रती केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता त्यांनी माफी मागितली आहे. मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकरी मवाली असल्याचं विधान केल्याने वाद निर्माण झाला होता.
मेरे शब्दों को तोड़ा मरोड़ा गया है अगर इससे किसी को ठेस पहुँची है तो मैं अपने शब्द वापस लेती हूँ । pic.twitter.com/s98ezkskzl
— Meenakashi Lekhi (@M_Lekhi) July 22, 2021
दरम्यान, मीनाक्षी लेखी यांनी माफी मागताना शेतकरी संसददरम्यान पत्रकरांशी बोलतांना म्हणाल्या, ‘मी केल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतरमध्ये कृषी कायद्यांविरोधात आयोजित आंदोलनादरम्यान एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. यावर जेव्हा मला माझं मत विचारल्या गेले त्यावेळी मी आंदोलन करणारे शेतकरी नाहीत, मवाली आहे असं म्हंटले नसून उत्तर देतांना मी शेतकरी नाही तर फक्त मवाली अशा गोष्टी करु शकतात असं म्हटलं होतं.’
त्या पुढे म्हणाल्या,’ मी केल्या विधानाचा विपर्यास करण्यात आणि त्यामुळे त्या मुळे शेतकरी किंवा अन्य कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागते आणि माझे शब्द मागे घेते,” असं लेखी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.