बिहार- वृद्धांना आश्रय देणाऱ्या व त्याची देखभाल करणाऱ्या पाल्यांना केंद्र सरकारकडे आयकरात सूट देण्यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री निर्णय नितीश कुमार यांनी बिहारमध्ये आता जर वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा केली नाही तर जेलमध्ये रवानगी केली जाऊ शकते असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
Bihar Cabinet-led by CM Nitish Kumar yesterday approved a proposal to punish with a jail term sons & daughters who abandon their elderly parents. The proposal has provisions of punishments which could go up to imprisonment if wards don’t look after their aged parents properly pic.twitter.com/y7z65AOTOD
— ANI (@ANI) June 12, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्र्यांनी राज्यातील पाल्यांना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आई-वडिलांची सेवा केली नाही तर त्यांना जेलमध्ये पाठवलं जाईल. आई-वडिलांच्या तक्रारीनंतर मुलांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्याचसोबत पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.’ दरम्यान, समाजात अशा अनेक घटना आहेत ज्यामध्ये आई-वडील वृद्ध झाल्यानंतर मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांकडून आई-वडिलांवर अन्याय केला जातो. त्यांना सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. म्हणून वृद्ध आई-वडिलांना सांभाळणाऱ्या मुलांनकडून सन्मानजनक वागणूक दिली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.