मुंबई : सध्या राज्यात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी जोर धरत आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठी वृत्त वाहिनीशी बोलतांना ठाकरे सरकारवर नामांतरावरून खोचक टीका केली आहे.
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले,”नामांतराची मागणी आमच्या सरकारने केली मात्र या मागणीला ठाकरे सरकारने पूर्ण न करत केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर ठाकरे सरकार असेच करणार होते तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’ तुम्ही मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ. ” अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केला.