मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधनानंतर राज्यात शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. राणेंच्या वादग्रस्त वक्यव्यानंतर सेना चांगलीच आक्रमक झाली होती त्यानंतर राणे यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. असे असताना सामनातून सुद्धा राणेंवर जोरदार हल्ले चालू होते. आजच्या सामनामध्ये राणेंच्या तोंडात साखर पडो असे म्हणल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे.
सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे..
काही "आडनाव" ऐकली..
कि शिवसेना लगेच गोड होते..
आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात..
युतीची आठवण येते..
सगळ एकदम गोड गोड..
म्हणून नेहमी सांगतो..
चड्डीत राहायचं!!!— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) August 31, 2021
नितेश राणे म्हणाले की, ”सामना ची भाषा मिठापासून ते गोड कशी करायची याची रेसिपी आम्हाला माहित आहे.. काही “आडनाव” ऐकली..की शिवसेना लगेच गोड होते.. आमच्या देवेंद्रजींची 10 मिनिटं मुख्यमंत्री वेगळी भेट घेतात.. युतीची आठवण येते.. सगळ एकदम गोड गोड.. म्हणून नेहमी सांगतो.. चड्डीत राहायचं!!!” असे ट्विट राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले होते. यावर शिवसेनेने सामनातून राणेंवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. ज्ञानाचा अंधकार महाराष्ट्रावर कधीच पसरला नव्हता, तरीही केंद्रीय मंत्री राणे राज्याला सुगीचे दिवस आणायचे म्हणतात, त्यांच्या तोंडात साखर पडो! असे सामनातून राणेंना लक्ष करण्यात आले आहे.