मुंबई – कर्नाटक राज्यामध्ये मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या मंडळाबद्दल घोषणा केली आहे. महामंडळाची घोषणा करत असताना पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
कर्नाटक सरकारकडून मराठा समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले, असे नितेश राणे यांंनी ट्विट करत म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!! आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले.. म्हणून पाहिजे परत एकदा.. फडणवीस सरकार!!
कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली!!!
आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले..
म्हणून पाहिजे परत एकदा..
फडणवीस सरकार!!! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2020
मराठा समाजाच्या प्रगतीसाठी म्हणजेच मराठा समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आल्याचे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले आहे.