देशात मंदीचे वातावरण असल्याची चर्चा सतत होत असली तरी देशाचा मुलभूत आर्थिक ढाचा मजबूत असल्याचा दावा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केला. त्या म्हणाल्या की या काळात महागाईही नियंत्रणात राहिली आहे. देशातील नागरीकांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांची खरेदी शक्ती वाढावी असा सरकारचा उद्देश असून त्याच उद्देशाने आपण यंदाचे बजेट सादर करीत आहोत असेही त्यांनी नमूद केले.
2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात सरकारने गव्हर्नन्सच्या पद्धतीत आमुलाग्र बदल केला असल्याचा दावाहीं त्यांनी केला. सरकारने जीएसटी पद्धत लागू करून देशात ऐतिहासिक आर्थिक सुधारणा केली असल्याचेही त्या म्हणाल्या.