नवी दिल्ली : देशभर गाजलेल्या निर्भया बलात्कार आणि निर्घूण खून प्रकरणात फाशीवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना त्यांचे म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे.
या दोषींना फासावर लटकावण्याची तारीख निश्चित करण्यासाठी कनिष्ठ न्यायलयात जाण्याची अनुमती सर्वोच्च न्यायलयाच्या न्या. आर भानुमथी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिली आहे. या खंडपीठात न्या. अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांचा समावेश आहे. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, या दोषींना आनंद मिळवण्यासाठी फाशी द्यायची नसून कायद्याने बांधील असल्याने त्याची अंमलबजावणी करायची आहे.
दिल्ली न्यायलयाने चारही आरोपींना फाशी देण्याची तारीख 1 फेब्रुवारी ठरवली होती. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.