नवी दिल्ली : फाशी ठोठावण्यास अवघे काही दिवस राहीले असताना निर्भया प्रकरणातील आरोपींनी अखेरच्या इच्छेबाबत मौन पाळले आहे, असे वृत्त समोर येत आहे.
देशभर खळबळ माजवणाऱ्या निर्भया बलात्कार आनि खून प्रकरणात त्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी अथवा त्यांच्या संपत्तीबाबत अद्याप मौन पाळले आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
कायद्यानुसार कुटूंबातील कोणत्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे, हे त्यांना विचारण्यात येते. त्यांच्या चीजवस्तू कोणाला द्याव्यात याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.
विनय शर्मा (26), मुकेश कुमार(32), अक्षय ठाकूर सिंग(31), पवन गुप्ता (25) यांना निर्भयावर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यांना एक फेब्रुवारीला फाशी ठोठवावी, असे नवे डेथ वॉरंट नुकतेच जारी केले आहे.
ी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेश याच्या दयेचा अर्ज फेटाळला. अन्य तीन आरोपींनी फाशीपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे अद्याप दयेचा अर्ज केला नाही. तसेच अक्षय आणि पवन यांनी अद्याप सर्वोच्च न्यायलयात दुरूस्ती याचिका दाखल केली नाही.
ए. पी सिंग या वकीलांपार्फत दाखल केलेल्या याचिकेत हा गुन्हा घडला त्यावेळी म्हणजे 16 डिसेंबर 2012ला पवन गुप्ता हा अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. मात्र हा त्याचा दावा त्याने त्याला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायलयात गेल्यावर्षी नऊ जुलैला केला होता. तो सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला होता.