मुंबई – आज (दि. २०) तब्बल सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले आहे. दिल्लीतील निर्भयाला अखेर आज न्याय मिळाला आहे.
दरम्यान, दोषींना फासावर लटकवण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता ‘रितेश देशमुख’ यानेही ट्विट करुन निर्भयातील दोषींना फाशी दिल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.
#JusticeForNirbhaya My thoughts and prayers are with the parents, friends & loved ones of Nirbhaya. The wait has been long but the justice has been served.
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 20, 2020
रितेश म्हणाला की, “माझी सद्भावना आणि प्रार्थना निर्भयाचे पालक, मित्रपरिवारासोबत आहे. दिर्घ काळ आपल्याला वाट पाहावी लागली परंतु आज न्याय मिळाला.” असं त्याने सांगितले.