नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला.
Supreme Court rejects review petition of Akshay Kumar Singh, one of the convicts in the 2012 Delhi gang-rape case. pic.twitter.com/5fhmZI94bW
— ANI (@ANI) December 18, 2019
आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. परंतु, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपीच्या मागणीला विरोध केला आहे. याप्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगितले आहे.
Solicitor General Tushar Mehta says seven days can be given to file review and that one week is the time prescribed to file mercy petition before the President.
Court says Petitioner can avail the relief of mercy petition within the time stipulated. https://t.co/vRKKytgf5o
— ANI (@ANI) December 18, 2019
दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली आहे. आरोपीच्या वकिलाला युक्तिवादासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला. अशिलाविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने न्यायालयात केला. पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी तुरूंग अधीक्षक सुनिल गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेखही करण्यात आला. यावेळी न्यायालयानंही यावर प्रतिक्रिया देत ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणं हा गंभीर ट्रेंड असल्याचं म्हटले.