वर्तिका सिंहने अमित शहांना रक्ताने लिहिले पत्र
नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले आहे. या पत्रातून निर्भयाच्या दोषींना एखाद्या महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी अशी मागणी वर्तिकाने केली आहे.
Lucknow: International shooter Vartika Singh has written a letter in blood to Union Home Minister Amit Shah stating that the four men convicted in Nirbhaya gang-rape case should be executed by a woman. (14.12.19) pic.twitter.com/Urgev019xf
— ANI UP (@ANINewsUP) December 15, 2019
वर्तिका सिंहने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निर्भयाच्या चारही दोषींना महिलेच्या हातून फाशी दिली जावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र तिने रक्ताने लिहिले आहे. निर्भयाच्या दोषींना माझ्या हातून फाशी दिली गेली पाहिजे. त्यामुळे एक महिलाही फाशी देऊ शकते असा संदेश संपूर्ण देशभरात जाईल. महिला कलाकार आणि खासदारांनी माझे समर्थन करावे, यामुळे समाजात बदल घडेल अशी अपेक्षा आहे, अशा आशयाचे पत्र वर्तिकाने लिहिले आहे.
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 ला धावत्या बसमध्ये झालेल्या निर्भयावर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार केले होते. या पाशवी अत्याचारानंतर अकरा दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर 29 डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली. या बलात्कारानंतर देशभर मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. या प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा झाली असून एक दोषी अल्पवयीन असल्याने दोन वर्षांनंतर त्याची सुटका करण्यात आली. एका दोषीने तुरुंगातच आत्महत्या केली. या प्रकरणी 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणातील फाशीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.