मुंबई – राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षांची धडपड सुरु होती.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला?? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2022
तर भाजप आणि सत्ताधारी मविआने आपल्याला मदत करावी, अशी विनंतीही संभाजी राजेंनी केली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजे यांना ट्विट करत महत्वाचा सल्ला दिला आहे.
नितेश राणे म्हणाले,’कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला?? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.’असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले होते की,’छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मीदेखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ. असं म्हणत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.