मुंबई : देशभरात करोना संसर्ग झपाट्यानं वाढत असून महाराष्ट्रातील रुग्ण वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत रुग्ण झपाट्याने वाढत असून लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्याकरिता २८ मार्च, २०२१ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात @CMOMaharashtra यांच्या आदेशानुसार रात्रीची जमावबंदी (‘नाईट कर्फ्यू’) लागू करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, मॉलसुद्धा रात्री ८:०० ते सकाळी ७:०० दरम्यान बंद राहतील.#MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 27, 2021
राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.
दरम्यान, या नाईट कर्फ्यूसोबतच मुंबईतले मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू राहू शकणार असल्याचं मुंबई महापालिकेने जाहीर केलंय. मुंबईतले मॉल्स आता रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंतच्या काळात बंद राहतील. याबाबत आपली मुंबई या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.
काय आहे ट्विट
”कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्याकरिता २८ मार्च, २०२१ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात @CMOMaharashtra यांच्या आदेशानुसार रात्रीची जमावबंदी (‘नाईट कर्फ्यू’) लागू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, मॉलसुद्धा रात्री ८:०० ते सकाळी ७:०० दरम्यान बंद राहतील.”