मुंबई – राज्यात सध्या प्रखरतेने उन्हाळा जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मात्र मागील दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार गारपीट आणि पाऊस पडत आहे. याचा फटका उन्हाळी फळे यांना बसत आहे. राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार आज अनेक ठिकाणी पाऊसही झाला. तर त्यानंतर 25 ते 27 तारखेपर्यंत राज्यातल्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
#SatarkAlert #Thunderstorms
२४ एप्रिल २२; ०९:५५ (पुढील ३ तास)
काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार सरी शक्य: रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे pic.twitter.com/bPfHBX8RIa— satark (@satarkindia) April 24, 2022
भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे कळविले आहे. त्यांचे ‘सर्तक’ या अँपवर अधिक माहिती दिलेली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर 25 ते 27 एप्रिलपर्यंत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळसह, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे