कोटा – लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेले विविध राज्यातील 7500 विद्यार्थी आता घरी परतणार आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोटा शहरात उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडसह देशभरातील इतर राज्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग विषयांच्या कोचिंगसाठी येत असतात. तिथे 7500 विद्यार्थी 25 मार्चपासून अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी घरी परतण्यासाठी सोशल मीडियावर एक अभियानही सुरू केले होते. या अभियानाची दखल घेत योगी सरकारने दि. 18 व 19 एप्रिल अशा दोन दिवसांत हे विद्यार्थी घरी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी सरकारची जबरदस्त इच्छाशक्ती, उपायांची कठोर आणि काटेकोर अंमलबजावणी आणि प्रशासनाची संपूर्ण सक्रियता यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून त्यांच्या या युपी मॉडेलमुळे जनपद पिलीभीत संपूर्णपणे संक्रमणमुक्त झाले असून अन्य देखील लवकरच रोगमुक्त होतील, असा सरकारला पूर्ण विश्वास आहे. देशातील अन्य राज्यांनीही योगी सरकारच्या यूपी मॉडेलच्या अंमलबजावणीविषयी उत्सुकता दर्शविली आहे, हे विशेष.