– नीलकंठ मोहिते
रेडा – मला जे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने मंत्रिपद मिळाले आहे.ते मी कधीही विसणार नाही.त्यामुळे मला कुठे काही काम न करता, फोटो काढून लावायचा नाही.मात्र शेतीसाठी पाणी व गावांसाठी रस्ते करायचे आहेत.मंत्रीपदाचा पावणे चार वर्षाचा कालावधी राहिला आहे.यामध्ये फक्त इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासाठी वापरणार आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल,यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.पहिल्या अधिवेशनात लाकडी – निंबोडी योजना सुरू केली आता दुसऱ्या अधिवेशनात दुष्काळी पट्ट्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न निकाली काढणार त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढच्या तीन पिढ्यांना पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे शनिवार (ता 13 रोजी)बोलत होते.यावेळी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोना संदर्भातील आढावा बैठक या ठिकाणी पार पडली.
पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, लाकडी – निंबोडी उपसा सिंचन योजना टेलर है पिक्चर बाकी है अशी शायरी राज्यमंत्री भरणे यांनी मारली.व म्हणाले,गेली 35 वर्षे शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न होता.दुष्काळ पट्टा म्हणून लाकडी, निंबोडी, मसोबाची वाडी,वायसेवाडी, धायगुडे वाडी,येथील शेतकऱ्यांची कित्तेक दिवसापासून मागणी होती. मात्र योजना रखडवलेली दिली होती.
आपल्या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील,यांच्या माध्यमातून या योजनेसाठी मी प्रयत्न केला.शेतकऱ्यांवरील जिरायत शिक्का संपवण्यासाठी स्वतः मी लक्ष दिले.यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला शब्द दिला होता तो शब्द पाळला आहेलाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेमध्ये सोळा गावातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा फायदा होणार आहे.साडे सतरा हजार एकर शेती क्षेत्राला पाणी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
कोरोना संदर्भात बोलताना भरणे म्हणाले की, कोरोना पेशंट वाढतील असा अंदाज तज्ञांनी वर्तवलेला आहे.त्यामुळे येणारे पंधरा दिवस कुटुंबासाठी,गावासाठी व तालुक्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत,त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या संदर्भात खूप काळजी घेणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यात सध्या कोरूना पॉझिटिव पेशंट 219 आहेत.ग्रामीण भागातले 179 तर शहरी भागातले चाळीस रुग्ण आहेत.या सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.ग्रामिण व शहरी भागाचा विचार केल्यास इंदापूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील दोन गावे हॉस्पॉट आहेत.
पिपरी,भिगवन,निरगुडे या गावांचा यामध्ये समावेश आहे. हे पेशंट वाढण्याचे कारण धार्मिक कार्यक्रम असतील, या भागात लग्नकार्य होते,सर्व लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात त्यामुळेच पॉझिटिव्ह ची संख्या वाढते आहे. त्यामुळे गर्दी टाळावी असे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले.
आपल्या गावामध्ये जी आठवडे बाजार आहेत,येथे गर्दी न करता,भाजीपाला खरेदी करावा.ग्रामीण भागातील सरपंच,तलाठी ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांना मी याद्वारे आव्हान करतो की,आठवडे बाजाराच्या ठिकाणी जेवढी गर्दी कमी करता येईल,तेवढी कमी करावी.तोंडाला मास्क प्रत्येक नागरिकांनी वापरणे गरजेचे आहे.सॅनिटायझर चा वापर करा असे आवाहन नागरिकांना राज्यमंत्री भरणे यांनी केले आहे.
आता शेतीच्या पाण्यासाठी दुसरी योजना तात्काळ राबवणार –
लाकडी निंबोडी पहिली योजना सुरू होत आहे.हे पहिल्या अधिवेशनात झाले तर,आता दुसऱ्या अधिवेशन उजनी धरणातले पाणी उचलायचे व शेटफळगडे येथील तलावात टाकायचे व हे पाणी खडकवासल्याच्या माध्यमातून शेतीसाठी पुरवायचे,व हेच पाणी २२ गावातील शेती साठी कसे जाईल याचे नियोजन करणार आहे.पुढच्या अधिवेशनात २२ गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी ग्वाही राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सव्वाशे कोटी रकमेच्या निधी टेंडर झाला-
तालुक्यातील सव्वाशे कोटी रकमेच्या रस्त्यांची कामाचे टेंडर झालेले आहे.तालुक्यातील रस्त्याची काम असू द्या. पिण्याचे पाणी असू द्या,या संदर्भातील कामाची कोणीही चिंता करू नका.मीच हे काम करून दाखवणार.माझ्या नसानसात काम आहे.मागासवर्गीय माणसाची काम केले तर,व सामान्य माणसाचे काम केले तर हा वर्ग कधी विसरत नाही.याची मला जाणीव आहे त्यामुळे विरोधकांनी कोणतीही टीका करू द्या मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही.असा टोला राज्यमंत्री भरणे यांनी विरोधकांना मारला.