औरंगाबाद – शिवसेनेचे खासदार खासदार विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ब्राम्हण समाज राऊत यांच्याविरूध्द आक्रमक झाल्याने राऊत यांनी अखेर ब्राम्हण समाजाची माफी मागितली आहे. राऊत यांनी सुरुवातीला ब्राह्मण समाजाची भेट घेत, आपण केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आहे.
मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. असे म्हणत त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली आहे. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, हे वादग्रस्त वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राऊत यांनी औरंगाबाद येथील ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांची माफी मागितली आहे.
दरम्यान, माफी मागताना राऊत म्हणाले की, माझ्याकडून बोलताना जे काही म्हटले गेले यामध्ये कोणाचाही अनादर करणे हा माझा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो आहे. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. तर काही चूक झाली असेल तर माफ करा असेही राऊत म्हणाले.