उस्मानाबाद – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज उस्मानाबदमधील भागाची पाहणी केली. तुळजापूरमधील भागाची पाहणी केल्यानंतर येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत.
महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी, अशी मागणी करणार आहोत असे शरद पवार म्हणाले.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीकं पावसात वाहून गेली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी आज पहिल्या दिवशी उस्मानाबाद मधील लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आणि भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत, असं शरद पवार म्हणाले.
तसेच या परतीच्या पासवामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या संकटाने खचून न जाता याचा धीराने सामना करावा लागेल, खासदारांचं शिष्टमंडळ घेवून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी अशी मागणी करणार आहेत, असेही शरद पवार म्हणाले.