पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर केला. त्याच्या अडीच महिन्यांनंतरही हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेली नाही. विद्यापीठाकडे •स्टेशनरी नसल्याने गुणपत्रिकांची छपाइंच होऊ शकली नसल्याची बाब पुढे आली आहे. एका आठवड्यात गुणपत्रिकांची छपाई न झाल्यास युवासेना भीक मांगो आंदोलन करून विद्यापीठाला पैसे देणार आहे. असा इशारा युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी दिला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिकासह सर्व प्रमाणपत्रे आऊटसोर्सिंग न करता स्वत:च पाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होत असून सर्व डाटाही विद्यापीठाकडे उपलब्ध होत आहे. या सर्व प्रमाणपत्राच्या छपाई करण्यासाठी लागणारी स्टेशनसरी निविदा काढून खरेदी केली जाते. विद्यापीठाला जवळपास सुमारे दहा लाख गुणपत्रांची छपाई करावी लागते. यंदा मात्र निविदा काढून कागद खरेदी करण्याच्या प्रक्रियेसदेखील विलंब झाला आहे. विद्यापीठ आवारात सुशोभीकरणासाठी अवाढव्य खर्च केला जात आहे. हा खर्च करण्यासाठी विद्यापीठाकडे जर पैसे असतील तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हिताच्या कार्यात अडथळे का येतात? परीक्षा विभागाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का? असा प्रश्न यादव यांनी उपस्थित कला आहे.
छपाईसाठी कागदसह अन्य स्टेशनरी उपलब्ध नसल्याचे सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रिका छापणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडीच महिन्यांनंतरही गुणपत्रिका प्राप्त होत नसल्याने विद्याथ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
कुलगुरूंना निवेदन
विद्यार्थी हितासाठी लागणाऱ्या साधन सामग्रोवर लक्ष न देता इतर कामांकडे लक्ष दिले जाते, असेही यादव यांनी स्पष्ट केले. यादव यांच्या नेतृत्वाखालील पुणे विद्यापीठ युवासेना कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे, सचिव ज्ञानंद कोंढो सरचिटणीस परमेश्वर लाड, उपाध्यक्ष विशाल हलावळे यांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन दिले.