पुणे – अवघ्या दहा दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. या आषाढीच्या निमित्ताने माऊलीचं दर्शन घेण्यासाठी कित्येक वाऱ्यांमधून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी निघाले आहेत.
पालखी सोहळ्यात सर्वात पुढे चालणारा माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. हा अश्व ज्येष्ठ शुक्ल अंकलीवरून प्रस्थान करतो आणि ज्येष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. तसेच वारी सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’.वारीप्रमाणेच रिंगण सोहळ्यालाही अनेक वर्षांची परंपरा आहे.
अशा या वारीचं, रिंगणाचं आणि माऊलींच्या अश्वाचे महत्त्व नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला हवं. यासाठी शितोळे सरकारचे प्रतिनिधी तुकाराम कोळी यांच्याशी केलेली खास बातचीत..