नवी दिल्ली – रूची सोयाला सरलेल्या वर्षात 88 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे त्या अगोदरच्या वर्षात कंपनीला 5754 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
ही कंपनी अडचणीत आली असून या कंपनीच्या अनुषंगाने दिवाळखोरी यंत्रणेने अंतर्गत सुनावणी चालू आहे. सरलेल्या वर्षात महसूल वाढून 12,849 कोटी रुपये झाला आहे. ही कंपनी 4325 कोटी रुपयाला विकत घेण्याची इच्छा पतंजली आयुर्वेद उद्योगाने जाहीर केलेली आहे.