रत्नागिरी – साखरपुड्याच्या दिवशी दुचाकी-ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरीतील लांजा येथे घडली आहे. अक्षय सोलीम असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाने नाव आहे. लग्नाच्या काही तासाआधी अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
अक्षयचे उद्या (ता.05) लग्न होते. आज साखरपुडा होता. साखरपुड्याच्या तयारीसाठी काही साहित्य खरेदीसाठी अक्षय दुचाकीवरून लांजाला गेला होता. त्यावेळी दुचाकीची इर्टीगा गाडीला धडक बसली त्यानंतर लगेच ट्रकला धडक बसल्याने ट्रकखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्न काही तासांवर असताना मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.