जयपूर – राजस्थानमधील राज्यवर्धनसिंह राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून राठोड यांना राजस्थानमध्ये पक्षाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
जयपूर ग्रामीण या मतदारसंघातून राज्यवर्धनसिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. राज्यवर्धनसिंह यांना 8 लाख 20 हजार 132 मते मिळाली होती. तर कृष्णा पुनिया यांना 4 लाख 26 हजार 961 मते मिळाली होती.
गुरुवारी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून यात राज्यवर्धनसिंह राठोड यांना स्थान मिळालेले नव्हते. राठोड यांना मंत्रिपद न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार राठोड यांना राजस्थानमधील महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.