नवी दिल्ली – बदलत्या काळात देशापुढील धोक्यांचे आणि युध्दांचे स्वरूप बदलणार आहे. भविष्यात सुरक्षेसंबंधित प्रश्न भारतासमोर उभे राहण्याची शक्यता आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
लष्करी साहित्य उत्सवात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते. लष्करी साहित्य सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात मला प्रचंड स्वारस्य आहे. मला वाटतं, भविष्यातील पिढ्यांना देशाचा आणि विशेषत: सीमांचा इतिहास समजला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.
कार्यालये नियमित सुरू झाली की मी एक समिती स्थापन करणार आहे. आपल्या सीमांचा इतिहास आणि त्यासाठी लढायला लागलेली युध्दे यांचा सामान्य नागरिकांना समजेल, अशा भाषेत समोर आणण्यासाठी ही समिती कार्यरत असेल.
राजनाथ सिंह म्हणाले, येथे लोकांना पुस्तकांच्या माध्यमांतून माहिती मिळत असते. अधिकारी आणि जवानांमध्ये असणारे हृद्य संबंध, लष्करी कर्मचाऱ्याचे अनुभव पुस्तकांतूनच जनतेसमोर येतात. त्यातून लष्करालाची कार्यपध्दती समजावून घेऊ शकेल.