नवी दिल्ली – भाजपकडून निवडणुकीच्या निमीत्ताने केले जाणारे जुमले आणि प्रत्यक्षातील विकास यात खूपच तफावत असल्याची बाब आसामातील लोकांच्या लक्षात आली आहे. जुमला आणि विकास यांच्यात काहीही संबंध नसतो असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
आसामातील मजुरांच्या हितासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत काय केले असा प्रश्नही त्यांनी भाजप सरकारला विचारला आहे. आसामातील निवडणुकींच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 1 एप्रिला होणार आहे. त्याचा प्रचार आज संपणार आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट जारी केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आसामात केवळ विकासाच्या गप्पा मारल्या आणि प्रत्यक्षात तेथे काहीच केले नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी तेथील प्रचार सभांमध्ये सातत्याने केला आहे.