नवी दिल्ली – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने तोंड भरून कौतुक केले आहे. या योजनेनुसार गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करण्यात येते. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
संस्थेचे कार्यकारी संचालक फतिह बिरोल यांनी सांगितले की, भारताने 2020 पर्यंत सर्व कुटुंबांना एलपीजी गॅस पुरवण्याचा संकल्प केलेला आहे. हा मुद्दा ऊर्जेचा नाही तर आर्थिक आणि सामाजिकही आहे. या योजनेनुसार आतापर्यंत 7 कोटी 40 लाख महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. या वर्षापर्यंत 8 कोटी महिलांना कनेक्शन देण्यात येणार आहे. खेड्यातील महिला लाकूड जाळून स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे धूर निघून त्यांचे डोळे आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.