मुंबई – शिवसेना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा नेते नारायण राणे यांचा बेडूक असा उल्लेख केला. त्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. मेळावा संपताच नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपा नेते नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
1) मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंनी काहीही केलेलं नाही.
2) 25 वर्ष शिवसेना सत्तेत राहणरा हे केवळ स्वप्नं.
3) उद्धव ठाकरे हे खेळण्यातले मुख्यमंत्री. ठाकरे मुख्यमंत्री पदाला लायक नाहीत.
4) शिवसेना आमदार हे मोदींच्या जीवावर निवडूण आले आणि सेक्युलर पक्षांसोबत गेले, बेईमानी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
5) हिंदूत्वार बोलण्याची नैतिकता सेनेला नाही.
6) निर्बुद्ध आणि शिवराळ भाषण काल मुख्यमंत्र्यांनी केलं. शेतकरी, कोरोना याचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात उल्लेख केला ऩाही. मुख्यमंत्री यांचं भाषण ताळमेळ नसलेलं.
7) सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार
8) सीबीआयप्रकरणी पुत्राला स्वत:च क्लिनचिट दिली. स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे.
9) 39 वर्षातला शिवसेनेचा इतिहास बाहेर काढेन.
10) घरात बसून मुख्यमंत्री पद चालवता येत नाही.