मुंबई – शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे. अन्यथा सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी ते चांगलं नसेल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
पवार म्हणाले, मला वाटते सरकारने संपूर्ण आंदोलन अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकल आहे की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगले नाही, असे त्यांनी सांगितले.