नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनामुळे जनसामान्यांसह सर्वंच राजकीय यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. प्रत्येकजण शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवित असून केंद्र सरकारच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आज दिल्लीत दिसत होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्र सरकारने नजरकैद्येत ठेवल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केल्यामुळे राजधानीतील राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले होते. तर दुसरीकडे बाजारपेठा सुरळीतपणे दिवसभर सुरू होत्या. वाहतुक व्यवस्था देखील फारशी खोळंबली नाही. अतिशय शांत वातावरणात भारत बंदला दिल्लीवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला.
पवार म्हणतात, त्याला महत्व देऊ नका
जंतरमंतरवर पंजाबमधील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनालाही राजकीय रंग चढताना दिसून येत होते. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनावर स्वतःची भुमिका स्पष्ट करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. 2010 मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या कृषी सुधारणेसबंधी लिहीलेल्या पत्रावर खुलासा केला. पवार म्हणाले की, ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे.
त्यांनी ते पत्र थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणासंदर्भांत मी पत्र लिहिले होते. यामध्ये कोणतेही दुमत नाही. पण आज जी तीन नवी कृषी विधेयके आहेत त्यांचा पत्रामध्ये उल्लेख नाही. विषय भरकटवण्यासाठी हे केले जात असल्याचाही आरोप शरद पवार यांनी केला. त्याला जास्त महत्व देऊ नका असेही ते म्हणाले.
“युपीए’ सरकारच्या कळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यंभार सांभाळत असताना कृषी कायद्यात मोठया बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहीले होते. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वंभूमीवर या पत्राची चर्चां होत आहे.
आपण शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शंविण्यासाठी बुधवारी राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांघी देखील उपस्थित राहणार आहेत. शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी राजधानीत आले होते.