मुंबई – राज्यात काल 4 हजार 88 रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 16 लाख 47 हजार 4 झाली असून, राज्यातले करोनामुक्तीचे प्रमाण 92 पूर्णांक 82 शतांश टक्के झाले आहे. काल करोना संसर्ग झालेले नवीन 5 हजार 708 रुग्ण आढळले.
यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या 17 लाख 74 हजार 455 झाली आहे. राज्यात सध्या 79 हजार 874 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल 62 रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला, राज्यभरात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता 46 हजार 573 झाली आहे, मृत्यूचा दर 2 पूर्णांक 62 शतांश टक्के एवढा आहे.