मुंबई – राज्यात आज दिवसभरात 4 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 17 लाख 61 हजार 615 जण करोनामुक्त झाले आहेत.
तसेच दिवसेंदिवस नवीन रुग्णांची कमी होणारी संख्या आणि दुसरीकडे करोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत असल्याने राज्याचा रिकव्हरी रेट 93.54 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्यात आज 2 हजार 949 नवीन रुग्णांची भर पडली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.56 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 5 लाख 4 हजार 406 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत.
तर 4 हजार 335 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 73 हजार 383 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात 2 हजार 949 रुग्णांची नोंद झाली.
आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 83 हजार 365 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 60 मृत्यूंपैकी 27 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत.