मुंबई – राज्यात आज करोनाचे 6.945 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याने 1 कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण 16 लाख 42 हजार 916 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.89 टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, आज राज्यात 5,640 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 155 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 35 हजार 665 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 68 हजार 695 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 90 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,883 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 78 हजार 272 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.