नवी दिल्ली – उद्योगांनी नियमाच्या चौकटीत काम करावे. साखळी करणे, गरजेपेक्षा जास्त किमती लावणे असे प्रकार करू नयेत. सरकारचे उद्योगांच्या कामकाजाकडे लक्ष आहे असे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाच्या व्यासपीठावर ते म्हणाले की, ‘जे नियमाने उद्योग करतील त्यांना कसलाही त्रास होणार नाही. त्याचबरोबर कर आणि हिशेबाबाबत सल्ला देणाऱ्या संस्थांनी नियमभंग होईल अशा शिफारशी उद्योगांना करू नयेत’, असे त्यांनी सांगितले.
मल्टिब्रॅंड रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 51 टक्के आहे. या नियमाचे पालन होईल याची खबरदारी सरकार घेणार आहे. मात्र कर सल्लागारांनी याबाबत उद्योगांना नकारात्मक शिफारशी करू नयेत.